आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोबाईलचा वापर ‘स्मार्ट’ हवा : अतिरेकाने दुष्परिणाम

Spread the love

पुणे : किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईल वापराचे मोठे आकर्षण आहे. एवढेच नाही, तर मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे चांगले व वाईट परिणाम याबाबत जागरूकता येत असली, तरी त्याचा मोह सुटत नसल्याचे दिसून येत आहे. मुलांना मोबाईलचा स्मार्ट वापर हवा आहे. त्याचवेळी मोबाईलच्या अतिरेकी वापराने शारीरिक व मानसिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा ‘मर्यादित व शहाणपणाचा’ वापर वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शिक्षण, माहिती व डिजिटल कंटेंटसाठी मोबाईलवर अवलंबित्व वाढत असताना अतिवापरामुळे एकाग्रता कमी होणे, अभ्यासात व्यत्यय येणे याबाबतची चिंता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काही वर्षांपूर्वी शाळेच्या दप्तरात फक्त पुस्तके, वही, पेन्सिल इतकेच असायचे. आज त्या दप्तरात एक अदृश्य वस्तू कायम असते, ती म्हणजे मोबाईल. अभ्यास, मनोरंजन, माहिती, मित्रमैत्रिणींशी संवाद यासंह इतर अनेक गोष्टी एका स्क्रीनवर उपलब्ध झाल्या आहेत.

पण या स्क्रीनच्या प्रकाशात विद्यार्थी काय शिकताहेत, काय हरवताहेत? याचे उत्तर शोधण्यासाठी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्चच्या वतीने शहरातील किशोरवयीन १५ ते १८ वर्षे वयोगटातील २,७०० विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाने अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आणल्या आहेत. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी माहिती दिली.

यावेळी ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रा. अजित शिंदे, सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या प्राचार्या डॉ. अनुपमा नेवरेकर, कलाशिक्षक नेहा पवार, व्यवस्थापिका (पीआर) स्वप्नाली कोगजे आदी उपस्थित होते.

get_footer();