आवृत्ती पुणे

बँक कर्मचारी असल्याचे भासवून फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दुचाकी परत देण्यासाठी ३७ हजार रुपये घेऊन फसवल्याची घटना गंगाधाम परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका ५७ वर्षाच्या नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या फिर्यादी यांनी सुझुकी कंपनीची टूव्हिलर गाडी विकत घेतली असुन ८१ हजार रुपयेचे बँकेचे लोन घेतले … Read more

बार्शीत श्री भगवंत रथ यात्रेत स्वच्छता मोहिम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : कर्मवीर ढोल-ताशा,ध्वज पथक, बार्शीच्या वतीने श्री भगवंत रथ यात्रेत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदस्यांनी रथाच्या पाठीमागे राहून रथ ज्या-ज्या मार्गावरून जातो तो संपुर्ण परिसर स्वच्छ करून शहराचे पावित्र्य राखले. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या ग्रामदैवत श्री भगवंत रथ यात्रेत विविध संस्था,मंडळे भाविक भक्तांसाठी फराळाचे पदार्थ,केळी वाटप करतात. त्या पदार्थांच्या प्लेट, द्रोन, … Read more

सचिन शेलार खून प्रकरणी १२ आरोपींना जन्मठेप व ५ लाखाचा दंड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काळेपडळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन शहाजी शेलार यांच्या खून प्रकरणी१२ आरोपींना जन्मठेप व ५ लाख रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. काळेपडळ परिसरात सामाजीक कार्य करीत असताना शेलार यांची लोकप्रियता वाढत असल्याने आरोपीनी संगनमत करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २७ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांचा काळेबोराटेनगर सुपर मार्केटजवळ खुन केल्याने … Read more

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची मुंबई येथे बदली

कारागृह विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दिला निरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती, मुंबई येथे बदली झाल्याने महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमा करीता जुगणू गुप्ता, डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह, स्वाती … Read more

बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा…विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी … Read more

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

मार्केटयार्ड जवळची घटना,पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड जवळच्या रस्त्यावरून पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले व पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पितळेनगर येथील आर. के. वाँशिग सेंटरजवळ मार्केटयार्ड येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला पायी जात असताना … Read more

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

मार्केटयार्ड जवळची घटना,पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड जवळच्या रस्त्यावरून पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले व पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पितळेनगर येथील आर. के. वाँशिग सेंटरजवळ मार्केटयार्ड येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला पायी जात असताना … Read more

मनीलाँड्रींग बाबत चौकशीच्या बहाण्याने १४ लाखाची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खोटी कागदपत्र बनवून तुम्ही मनीलाँड्रींग केली आहे, तुमची चौकशी करावी लागेल, असे सांगुन कल्याणीनगर मधील एका तरुणाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील फिर्यादी यांना अज्ञात मोबाईल धारकाने संपर्क साधला व मुंबई क्राईम ब्रँच ऑफीसर … Read more

धानोरीतील महिलेची आठ लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुमच्या नावाने ड्रग विदेशात पार्सलमधून जात आहेत.तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भीती दाखवून धानोरीतील महिलेची ८ लाख रुपयाची फसवणुक करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत धानोरीतील ३९ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ७ ते १० जुलै दरम्यान घडली. फिर्यादी महिलेस अनोळखी व्यक्तीने … Read more

कविता हृदयातून यावी लागते : हरिश्चंद्र पाटील

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : कवितेसाठी चिंतन,मनन नितांत गरजेचे असून कविता लिहिण्यासाठी तपश्चर्या गरजेची आहे. कविता सहजासहजी जमत नसते तर ती हृदयातून यावी लागते असे प्रतिपादन लेखक हरिश्चंद्र पाटील यांनी केले. येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने आयोजित 32 व्या कालिदास महोत्सवात मेघदूत पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. कालिदास मंडळाने आजपर्यंत अनेक … Read more