आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लागा तयारीला, महापालिका निवडणुका होणार चार महिन्यात

Spread the love

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील ४ महिन्यांच्या आत घ्या, असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गेली ३ वर्षे रखडलेल्या महापालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यांत निघाली पाहिजे. यानंतर चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मंगळवारी, ६ मे रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात दिले आहेत.

राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. एका बाजूला देशभर युद्धाचे सावट असताना सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे.

राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्याला आता जेमतेम एक महिना उरला आहे. पावसाळ्यात राज्यभरातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कशा घेणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

येत्या चार आठवड्यांत प्रभाग रचना, प्रभागांमध्ये किती जागा असतील हे निश्चित करून त्यानुसार आरक्षण जाहीर करावे लागणार आहे.

get_footer();