महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारतात तांदळापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये बिर्याणी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा आणि लोकप्रिय पदार्थ आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार असे आढळून आले आहे की भारतात तीन ॲप्सवर प्रति मिनिट सरासरी २०० बिर्याणीची ऑर्डर दिली जाते. जी वर्षाला दहा कोटी बिर्याणी पर्यंत जाते. बिर्याणी ही पौष्टिक आरोग्याला त्रासदायक नसणारी, परवडणारी आणि सहज उपलब्ध होणारी आहे. त्यामुळे ही डिश लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय आहे. बासमती तांदूळ आणि बिर्याणी यांचे अतूट नाते आहे. धान्याचा राजा तांदुळ आहे तर बिर्याणीचा राजा बासमती आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात बासमती तांदळाची विक्री जास्त होत आहे आणि त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे 7 जुलै महिन्यातील पहिला रविवार हा जागतिक बिर्याणी दिवस म्हणून साजरा केला जातो. तयार अन्न वितरणाची सेवा पूरवणाऱ्या एका कंपनीने जानेवारी 2023 ते जून 2023 दरम्यान दिलेल्या ऑर्डरचा डेटा सादर केला आणि त्यात 2022 च्या तुलनेत मागील साडेपाच महिन्यांत बिर्याणीच्या ऑर्डरमध्ये तब्बल 8.26 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मागील वर्षाच्या एका रेकॉर्डनुसार 7.6 कोटींहून अधिक बिर्याणी ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत. बिर्याणीच्या ऑर्डरबाबत विचार केल्यास ज्या शहरांनी सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली त्या शहरांमध्ये पहिला क्रमांक बेंगळुरुचा आहे. त्यानंतर मुंबई दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते.
बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे. बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.
बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे. बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये फरक आहे.
तांदळापासून खिचडीभात, मसालेभात, डाळभात, केसरी भात, नारळी भात, पुलाव, बिर्याणी असे विविध प्रकार बनविता येतात. हे सर्व पदार्थ आरोग्यास सकस व पौष्टिक असतात. पण, त्यात बिर्याणीचा सगळ्यात वरचा नंबर आहे. बासमती तांदूळ हा बिर्याणीचा अविभाज्य भाग आहे. तांदूळ हे जगातील सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणार्या मुख्य अन्नांपैकी एक आहे, तीन अब्जाहून अधिक लोक उर्जेचा प्राथमिक स्त्रोत म्हणून त्यावर अवलंबून आहेत.जगभरातील अनेक देशांमध्ये हे मुख्य अन्न आहे.
जे एक पौष्टिक आहे आणि ते लहान बाळापासून,आजारी, वयोवृद्ध असे सर्वाना चालते .तांदूळ हे भारतातील सर्वात महत्वाचे अन्न पीक आहे जे एकूण पीक क्षेत्राच्या सुमारे एक चतुर्थांश भाग व्यापते आणि भारतीय लोकसंख्येच्या अर्ध्या लोकांना अन्न पुरवते. त्यामुळे भारत सरकार ही रेशनमध्ये प्रामुख्याने लोकांना शिधा म्हणून तांदूळ देते. आयुर्वेदात तांदळाची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. असे म्हणतात पृथ्वीवर अस्तित्वात आलेले तांदूळ हे पहिले तृण धान्य आहे.
बहुतेक सर्व रोगांमध्ये अशा प्रकारच्या जुन्या तांदळाचा पथ्य म्हणून उल्लेख केलेला सापडतो. वेदांमध्येही तांदळाचा उल्लेख सापडतो. भारतीय संस्कृतीनुसार यज्ञ, पूजा, लग्नकार्यात तांदळाचा उपयोग केला जातोच, पण जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये तांदूळ हे भरभराटीचे, समृद्धीचे व वंशोवृद्धीचे प्रतीक मानले जाते. भारतातील सिंधू खोऱ्याच्या दोन्ही बाजूला बासमती तांदळाच्या उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन केले जाते.
बासमती तांदूळ ग्राहकांच्या गटांमध्ये वाढत्या पसंतीस उतरत आहे, मुख्यत्वे त्याच्या उत्कृष्ट चव आणि इंद्रियांना अत्यंत आनंद देणारा सुगंध आहे. बासमती तांदूळ भारतातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार या उतेरकडील राज्यांत होतो. जागतिक स्तरावर ओळख असलेल्या आणि मागणी असलेल्या वाणांमध्ये बासमती 1121, 1401 बासमती, कस्तुरी, हरियाणा बासमती, पुसा बासमती, वल्लभ बासमती इ.चा समावेश आहे.
भारत हा जगातील बासमती तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. देशातील वार्षिक उत्पादन वर्षाला सुमारे 8 – 12 दशलक्ष टन इतके आहे, ज्यापैकी सुमारे दोन तृतीयांश निर्यात केले जाते. उरलेला देशांतर्गत वापरला जातो.जगात चीन नंतर भारत सर्वात जास्त तांदूळ निर्यातदार देश आहे. एकूण भारतीय तांदूळ निर्यातीमध्ये बासमती तांदळाचा वाटा 30% ते 40% च्या श्रेणीत आहे तर तांदूळ निर्यातीत गैर-बासमती तांदूळाचा वाटा 60 ते 70% आहे. भारत दरवर्षी जगभरातील जवळपास 132 देशांना बासमती तांदूळ निर्यात करतो आणि भारतीय बासमती तांदळाची प्रमुख निर्यात ठिकाणे म्हणजे इराण, इराक़ सौदी अरेबिया, UAE आणि यूरोप आहे.
