वयाच्या 90 व्या वर्षीही चालवतात रिक्षा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पंजाब : पंजाबी गुरदेव सिंग यांनी पंजाब राज्याची अडीच कोटी रुपयांची बैसाखी लॉटरी जिंकली.
पंजाबच्या मोगा जिल्ह्यात राहणारे गुरदेव सिंह यांच्याकडे आज कोट्यावधींची संपत्ती आहे. पण वयाची नव्वदी गाठलीय तरी ते रिक्षा चालवतात.
या वर्षीच्या एप्रिल महिन्यात रिक्षाचालक गुरदेव सिंह यांनी पंजाब राज्याची अडीच कोटी रुपयांची बैसाखी लॉटरी जिंकली होती.
या लॉटरीने त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. मातीच्या घरात राहणारे गुरदेव सिंह यांचा मुलगा आणि मुलगी आता नव्याने बांधलेल्या घरात राहू लागलेत.
मात्र गुरदेव सिंह सांगतात की, त्यांना आळसात बसून राहायला आवडत नाही. रिक्षा चालवून, सतत काम करून आरोग्याची काळजी घेण्यावर त्यांचा विश्वास आहे.
लॉटरी जिंकली आणि आयुष्य बदललं गुरदेव सिंह सांगतात की, त्यांनी त्यांच्या चार मुलांसाठी आणि एका मुलीसाठी पक्कं घर बांधलं आहे.
यासोबतच त्यांनी आपल्या मुली आणि मुलांसाठी नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यांची नातवंडं आता चांगल्या शाळेत शिकायला जातात.
गुरदेव सिंह म्हणतात, “जर मी शांत बसलो आणि काहीही केलं नाही तर मी आजारी पडेन. रिक्षा चालवल्याने माझ्या हातापायाला काम मिळतं आणि मी तंदुरुस्त राहतो. मी निवांत झोपलो तर मात्र सगळं बिघडेल.” या कामांसाठी गावातील लोक गुरदेव सिंग यांचे खूप कौतुक करतात.
या कामांसाठी गावातील लोक गुरदेव सिंग यांचे खूप कौतुक करतात. लॉटरी जिंकल्याबद्दल ते म्हणतात, “आमच्या मनात देवाची भीती आहे? पैशाचा गर्व करून काय करणार? केवळ मुलांनी दोन गाड्या घेतल्या आहेत. मला याबद्दल काहीच अप्रूप नाही.” गुरदेव सिंह म्हणतात, “पूर्वी गरीबी होती, पण आता त्यांना पक्की घरं मिळाली आहेत. माझी मुलगी भाड्याच्या घरात राहायची, मी तिच्यासाठी नवं घर विकत घेतलं. मी पैसे वाया घालवले नाहीत, हे पैसे ज्या कामासाठी खर्च करायचे होते आणि ते मी खर्च केले.” समाजसेवेचा सकारात्मक विचार गुरदेव सिंह हे पूर्वीपासूनच समाजसेवेच्या कामात सहभागी व्हायचे. पण आता त्यांनी या कामांना अधिक प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. ते त्यांच्या रिक्षात ठवलेल्या कुदळीच्या साहाय्याने रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे भरतात आणि फुलझाडांनाही पाणी देतात. गुरदेव सिंह म्हणतात, “मी फार पूर्वीपासून समाजसेवा करत आलोय. उन्हाळ्यात झाडांना पाणी देतो, त्यांची देखभाल करतो. कधीकधी त्यांची छाटणी करावी लागते ती करतो.”
ते पुढे सांगतात, “मी आयुष्यात दुसरं कोणतंही औषध घेतलं नाही. कारण या गोष्टींमुळे मला ऊर्जा मिळते आणि तेच माझ्यासाठी उत्तम औषध आहे.”
या कामांसाठी गावातील लोक गुरदेव सिंग यांचं खूप कौतुक करतात. गुरदेव सिंह सांगतात की, ते भविष्यातही लॉटरी काढत राहतील. लॉटरी जिंकल्यानंतर रुग्णालय बांधणारे दोन मित्र फाजिल्का जिल्ह्यातील जलालाबादमध्ये राहणारे डॉ. स्वरण सिंह आणि डॉ. राजपाल या दोन मित्रांनाही काही महिन्यांपूर्वी पाच कोटींची लॉटरी लागली होती. हे दोन डॉक्टर मित्र अनेक दिवसांपासून परिसरात नेत्रसेवा केंद्र चालवत आहेत. मात्र आता त्यांनी जलालाबादमध्ये आधुनिक मशिन्ससह नेत्र रुग्णालय बांधायचं काम सुरू केलं आहे. डॉ. राजपाल सांगतात की, त्यांना पाच कोटींची लॉटरी लागली. त्यापैकी दोन कोटी रुपये कर म्हणून भरावे लागले. उरलेले पैसे त्यांनी डोळ्यांचं रुग्णालय बांधण्यासाठी गुंतवले आहेत. ते पुढे सांगतात, “या पैशातून जमीन आणि मशीन्स खरेदी करण्यात आल्या आहेत. हा पैसा रुग्णालय बांधण्यासाठी पुरेसा आहे असं आम्हाला वाटलं होतं, पण महागाईमुळे हे पैसे पुरले नाहीत.” रुग्णालयासाठी कर्ज आता रुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असून दीड ते दोन वर्षांत हे रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी सज्ज होईल, असं डॉ. राजपाल सांगतात. डॉ. स्वरण सिंह सांगतात की, रुग्णालय उभं करण्यासाठी त्यांच्याकडे जमीन नव्हती, आवश्यक यंत्रसामग्री नव्हती. या पैशातून त्यांनी याची खरेदी केली. या दोन्ही डॉक्टर मित्रांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे सध्या असलेली जागा माफक भाड्यात असल्याने ते कमी शुल्कात लोकांना चांगल्या सुविधा देत आहेत. जोपर्यंत रूग्णालय बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत जुन्या नेत्रसेवा केंद्रात आधुनिक मशिन्सचा वापर करून लोकांना सुविधा पुरविल्या जातील. आणि दोन नवे शल्यचिकित्सकही कामावर रुजू होतील असं त्यांनी सांगितलं. या दोन्ही डॉक्टर मित्रांचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे सध्या जी जागा आहे त्यासाठी त्यांना अगदी माफक भाडं द्यावं लागतं. त्यामुळे ते रुग्णांना अगदी कमी शुल्कात लोकांना चांगल्या सुविधा देत आहेत. लॉटरी जिंकून मिळाली ओळख लॉटरी जिंकल्यानंतर लोक त्यांना ओळखू लागल्याचं हे दोन्ही डॉक्टर मित्र सांगतात. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं. डॉ. स्वरण सिंह म्हणतात की, ही लॉटरी जिंकून त्यांचं रुग्णालय बांधायचं स्वप्न पूर्ण होणार नाही. पण त्यासाठी ते आणखी लॉटरी काढत राहतील.
ते म्हणतात, “इथे काम करणारे लोक मोफत उपचार मिळवण्यासाठी शहराबाहेर जातात. खासगी रुग्णालयांचे शुल्क खूप जास्त असून ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे लोकांना कमीत कमी पैशात चांगले उपचार मिळावेत अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत.” पहिली लॉटरीही दोघांनी मिळून जिंकली होती. या दोघांचे खूप चांगले संबंध आहेत. आणि आयुष्यभर एकत्र राहून ते लोकांची सेवा करतील असं ते सांगतात.
‘डॉक्टरांना नाही तर लोकांना लागलेली लॉटरी’ जलालाबादचे रहिवासी असलेले विक्रम सांगतात की, या लॉटरीमुळे केवळ डॉक्टर मित्रच नव्हे तर जलालाबाद परिसरातील लोकही जिंकले आहेत. कारण या परिसरात एखादं चांगलं नेत्र रुग्णालय व्हावं अशी सर्व लोकांची इच्छा होती. ते म्हणतात, “जलालाबाद शहर सीमेवर असल्याने येथील आरोग्य सुविधा फारशा चांगल्या नाहीत. पण लोकांना चांगल्या आरोग्य सुविधांची नितांत गरज आहे. ते पूर्वी गरजू लोकांना मोफत सेवा देत असत आणि लोक आजही त्यांच्याकडून चांगल्या सेवेची अपेक्षा करतात.”
