कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त व्याख्यान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : आपणास आपल्या माणसात राहून आनंदी जीवन जगायचे असेल तर मोबाईल चा वापर कमी करावा “असे आवाहन अभ्यासक धीरज शेळके यांनी केले.
उपळे-दुमाला-येथील श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कर्मवीर जयंती सप्ताह व्याख्यान मालेत धीरज शेळके यांचे “प्रसार माध्यमे आणि आजची मुले” या विषयावर वास्तववादी मार्गदर्शन झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी मुख्याध्यापक व प्रमुख पाहुणे धीरज शेळके यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या वेळी धीरज शेळके यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तर शिक्षक शंकर शिंदे यांनी मुख्याध्यापक यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक वैद्य यांनी केले तर शिंदे व्ही.व्ही. यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या वेळी बोलताना धीरज शेळके यांनी आजची तरुण मुले कशा प्रकारे सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत हे सांगतानाच सोशल मीडिया काळाची गरज जरी असली तरी आपण मीडिया चा वापर योग्य आणि आवश्यक त्या वेळी करायला हवा.
सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसे तोटे आहेत हे स्पष्ट करतानाच अध्यक्षीय भाषणा नंतर सहशिक्षक सदाशिव सोनके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालया च्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती तवले यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पूनम जुनवनकर, कु. समृद्धी ठोंगे या विद्यार्थिनींनी केले.
