पालकांचा संताप, परीक्षा फेर घेण्याची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत विचारले जातात अशा प्रकारचे प्रश्न देण्यात आलेले होते. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा आणि त्याचा काडीमात्र संबंध नसल्याने पालकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
या परीक्षेत भूम तालुक्यातील सर्वच शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची जर बुद्धिमत्ता तपासली तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवता येतील का? तसेच दिड तासाचा वेळ पुरेसा नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
याचा विचार प्रश्नपत्रिका काढणाऱ्या परीक्षामंडळाने करणे गरजेचे होते. याबाबतीत पालकात तीव्र संताप असून विद्यार्थ्यांनी एवढी मेहनत करून अभ्यास करून परीक्षेत मात्र वेगळेच प्रश्न विचारले गेल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.
महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून ५ वी वर्गातील विद्याथ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली होती. शिष्यवृत्ती परीक्षेत येणारे संभाव्य प्रश्न म्हणून त्यांनी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाची पूर्ण तयारी करून घेतलेली होती.
याबाबतीत आता पालकांनी गटशिक्षण अधिकारी भट्टी यांना निवेदन दिलेले असून परीक्षा रद्द करून तात्काळ फेर परीक्षा घेण्याची मागणी पालकांनी केलेली आहे.
या निवेदनावर मोटे संदीप शिवाजीराव, प्रियंका नवनाथ वरवडे, हेमा सचिन आसलकर, भाग्यश्री प्रदीप डांगे, सविता मोहन बागडे, नितीन माळी, दत्तात्रय हराळ, अशोक बोराटे, सचिन होळकर, भोलेनाथ माळी, सचिन पाटोळे, अनिरुद्ध उनवने, बाळासाहेब वाघमारे आदिच्या सह्या आहेत.
