महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : येथील कवी रामचंद्र इकारे यांना त्यांच्या ‘ माणुसकीचं आभाळ’ या काव्यसंग्रहासाठी विश्वकर्मा तरुण मंडळ, वडशिवणे तालुका करमाळा यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मातोश्री चांगुणाबाई इंगळे स्मृती राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथे लता मंगेशकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र झुंजारराव यांच्या हस्ते व प्रख्यात कवयित्री कल्पना दुधाळ, प्रा डॉ कीर्ती मुळीक, प्रा वैजयंती जाधव, रवींद्र रायकर,गायत्री क्षीरसागर,मंडळाचे अध्यक्ष व संयोजक सोमनाथ टकले, बाबुराव इंगळे आदींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी व सुहास घुमरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्तात्रय पिसाळ, डॉ जनार्दन भोसले यांच्यासह मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेख संग्रहास याआधी साहित्य सेवा फाउंडेशन चा माणगंगा साहित्यप्रेमी पुरस्कार मिळाला असून ॲग्रोवन न्यूज परिवार यांचाही राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले.
