जगावे कसे याचा पाचव्या दिवशी दिला मौलिक संदेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : आपले वर्तमान आणि भविष्य याला आपणच जबाबदार असतो. तुमच्या पापपुण्याची जबाबदारी अन्य कुणावरही नसते. आपण जबाबदारी न घेता दुसऱ्यावर ती ढकलण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. आपले भाग्यविधाता आपण स्वतःच आहात. मी जबाबदार आहे ही गोष्ट आपण स्वीकारणे गरजेचे आहे, असा मौलिक संदेश घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी दिला. गोयल गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महावीरगाथा’ या प्रवचनमालेचे पाचवे पुष्प त्यांनी गुंफले.
महावीर गाथेसाठी ज्यांनी विशेष योगदान दिलेले आहे त्या मान्यवरांचा सत्कार पुना सकल संघातर्फे करण्यात आला. राजकुमार चोरडीया, लखीचंद खिवंसरा, रमणलाल लुंकड, राजेश नहार या मान्यवरांचा सत्कार पुना सकल संघातर्फे विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, विलास राठोड, अनिल नहार, बाळासाहेब धोका यांच्या हस्ते करण्यात आला.
