महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : बेपत्ता बालकांचा १२ तासाच्या आत शोध लावण्यात पोलीसांना यश आले आहे.
दि.२३ एप्रिल रोजी सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास मलिकमा शेख यांची दोन नातवंडे (बालिका वय-१४ व बालक वय-१२) शाळेत जात आहे असे सांगून घरातुन बाहेर पडली. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास शाळा सुटुन देखील ही बालके घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरु केली.
परंतु सर्वत्र शोध घेऊन देखील ही बालके कोठेही मिळून न आल्याने त्यांच्या पालकांनी अज्ञात कारणास्तव फुस लावुन पळवुन नेल्याची तक्रार बझार पोलीस ठाण्यात केली. मलिकमा शेख यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी मुलांच्या शाळेत, मित्रांकडे तथा अन्यत्र बालकांचा शोध घेऊन या परिसारातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. परंतु ही बालके मिळून न आल्याने तक्रारदार यांच्या नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेणे सुरु केला.
त्यात अशी माहिती मिळाली की ही २ बालके त्यांचे नातेवाईक यांच्या घरी आहेत. त्याठिकाणी जावून शोध घेता ही बालक दि. २४ एप्रिल रोजी मिळून आली आहेत. या गुन्ह्यातील बेपत्ता बालकांचा पोलीसांनी अवघ्या १२ तासात शोध घेवून गुन्हा उघडकीस आणला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त विभाग-२ अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, अल्ताफ शेख, राहुल आवारे यांनी पार पाडली आहे.
