कुटुंबातील पाच जन वाहून गेले, तीन मृतदेह हाती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबावर रविवारी काळाचा घाला पडला आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात गेलेल्या त्यांच्या कुटुंबातील पाच जन अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तीन मुली, मुलगा व महिला, असे पाच जण वाहून गेले आहेत. त्यापैकी तीन जनाचे मृतदेह हाती लागले आहेत.
रविवारी दुपारी १२:३० वाजता ही दुर्घटना घडली, हडपसरच्या सय्यद नगर येथे राहणाऱ्यात्यांच्याकुटुंबात चार दिवसांपूर्वीच एक विवाह झाला होता. त्यामुळे या नवदाम्पत्यासह घरातील व नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले.
१७ सीटर बस करून येथून लोणावळ्यात गेलेल्या कुटुंबातील तीन मुली, मुलगा व महिला, असे पाच जण वाहून गेले आहेत. त्यातील तिघांचे मृत देह मिळाले आहेत.
नवदाम्पत्य यात वाहून गेले होते, मात्र, त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
वाहून गेलेल्यांपैकी ३ जनाचे मृतदेह बाहेर काढले. तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात मृतदेहविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. शाहिस्ता अन्सारी (वय ३५), आदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), हुमेदा अन्सारी (वय ६), अमिना अन्सारी (वय ४) वर्षे, सर्व जण रा. सय्येदनगर, हडपसर, पुणे), अशी वाहून ची नावे आहेत.
अदनान अन्सारी, मारिया अन्सारी यांचा शोध सुरु आहे. पाऊस पडल्याने हे पाच जण वाहून गेले. ही घटना दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. ही घटना हडपसरमध्ये समजताच येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
सय्यदनगर येथील मौलाना असणारे सलमान अन्सारी यांच्या दोन मुली, त्यांची मेहुणी व मेहुणीची एक मुलगी आणि मेहुण्याचा एक मुलगा, असे पाच जण या पुरात वाहून गेले. सलमान अन्सारी यांच्या दोन मुली या हांडीवाडी येथील शाळेत शिकत होत्या. ही चारही मुले लहान असून, त्यांची मेहुणी नूर अन्सारी ही घरकाम करत होती.
