सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : लोकसभा निवडणुकीच्या काळात आदर्श अंचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन भूमच्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात तहसील कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आदर्श आचारसंहितेची नियमावलीची माहिती दिली. भूम, परंडा, वाशी व कळंब तालुक्यातील काही गावे या परंडा विधानसभा मतदारसंघात येत येतात.
याकरीता ३७२ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे. लोकसभेसाठी परंडा विधानसभा मतदार संघात ३ लाख २४ हजार मतदार आहेत. यामध्ये १ लाख ७२ हजार पुरुष मतदार, १ लाख ५२ हजार महिला मतदार आहेत. तसेच तृतीयपंथी मतदार ६ आहेत.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून गेल्या वर्षभरापासून मोहिम हाती घेतली आहे. यासाठी स्विप कक्षाच्या माध्यमातून मतदार संघात मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी गटशिक्षण अधिकारी राहुल भट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अयोगाच्या सुचनेनुसार मतदारसंघात असलेले ८५ वर्षांवरील ६ हजार ९०८ व दिव्यांग ३ हजार ६८० या मतदार आहेत.
८५ वर्षावरील मतदार, दिव्यांग व दृष्टीहीन मतदारांची पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात फिरते पथक १६, तर ६ व्हिडीओ पथकाची करडी नजर राहणार आहे.
एसएसटीचे ३० पथक कार्यरत राहणार आहेत. एसएसटी पथके १० ठिकाणी असणार आहेत. आचार संहितेच्या संदर्भात सर्व राजकीय पक्षाचे नेते यांचीही निवडणुकीसंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे.
यावेळी भूम तहसीलदार जयवंतराव पाटील, परंडा तहसीलदार घनशाम आडसुळ, वाशी तहसीलदार राजेंद्र लांडगे, नायब तहसीलदार आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी आश्विनकुमार कांबळे, सतिश बोराळे, सागर बागडे, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.
