महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : ज्यांना अनेक दुश्मन होते,मात्र ते कोणाचेच दुश्मन नव्हते ते म्हणजे तीर्थंकर महावीर. तीर्थंकर महावीरांनी त्यांना त्रास देणाऱ्याला देखील स्वर्गात स्थान दिले. क्षमा करणे हा एक सिद्धांत जरी जगाने पाळला तरी या जगात आतंकवादी जन्माला येणार नाहीत. असे आपल्या व्याख्यानातून बोलताना उपाध्याय प. पु .प्रवीणऋषीजी म.सा. यांनी सांगितले.
ज्यांनी अहिंसा,प्रेम, करुणा जगाला दिली. ज्यांनी सर्वच गोष्टीवर विजय मिळवला अशा महावीरांची गाथा सर्वानी ऐकण्यासाठी यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मी कोणाचाच दुश्मन होणार नाही, माझी कोणाशीच दुष्मनी नाही हा महावीरांचा एक सिध्दांत जरी या जगाने अवलंब केला तरी या जगात आतंकवादी जन्माला येणार नाहीत.
असे त्याने यावेळी सांगितले. महावीर हे फक्त जैनांचे नाहीत तर सर्वाचे आहेत त्यांचे विचार जगत कल्याणासाठी आहेत. तेच विचार प्रत्येक व्यक्ती पर्यंत महावीर गाथेच्या माध्यमातून पोहचवले जाणार आहेत.
गगन सिग्नेट सोसायटी मधून शांतीनगर शेजारील साळवे गार्डन येथे भव्य जुलूस काढून गुरुदेवांचे स्वागत करण्यात आले. हजारो भाविक या जुलूस मध्ये सहभागी झाले होते. उद्या दिनांक 14 रोजी सकाळी 7.15 वाजता शांतीनगर बॅक गेट ते गोयल गार्डन भव्य जुलूस निघणार आहे.
