दीक्षा समारंभ उत्साहात
महाराष्ट्र जैन वार्ता
आश्वी : येथील व्यापारी नवलमल रामचंद्र भंडारी यांची नात व सुशील भंडारी, वैशाली भंडारी यांची कन्या प्रतिक्षा भंडारी हिने चतुर्विध संघाच्या उपस्थितीत काल रविवारी (दि.९) जैन भगवती दीक्षा ग्रहण केली.
दीक्षा घेतल्यानंतर तिचे जैन साध्वी मोक्षदा असे नामकरण करण्यात आले आहे. आश्वीच्या इतिहासात प्रथमच दीक्षा महोत्सवाचे आयोजन समितीने केले होते. शोभायात्रा काढून दीक्षास्थळी तिला आणण्यात आले.
त्यावेळी उपाध्याय प. पु. श्री प्रवीणऋषीजी म. सा. यांच्या सानिध्यात प्रतिक्षा भंडारी यांनी जैन भागवती दीक्षा ग्रहण केली. दीक्षा महोत्सवासाठी प. पु. श्री प्रवीणऋषीजी म. सा., प. पु.श्री तीर्थेशऋषी म. सा, प. पु. श्री लोकेशॠषीजी म. सा., प. पु. श्री कैवल्यरत्नाश्री म. सा., प. पु. चंदनबालाजी म. सा., प. पु. पद्मावतीजी. म. सा., प. पु. साध्वी सन्मतीजी म. सा., प. पु. गौरवसुनंदाजी म. सा., सेवाभावी किर्तीसुधाजी म. सा., प. पु. विश्वदर्शनाजी म. सा., प. पु. जयश्रीजी म. सा. आदींसह ४० साध्वी उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रतिक्षा ही साध्वींचा वेश परिधान करून मंचावर येताच उपस्थितांनी जयजयकार केला.
दीक्षापूर्वी प्रतिक्षा भंडारी म्हणाली की, राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म. सा. तसेच अनेक साधू-साध्वींच्या आशिर्वाद मला लाभले. गुरूवर्या सुनंदाजीम.सा. यांनी धर्म संस्कार घडविले. माता, पिता, भंडारी परिवार यांनी मला संयमीव्रत धारण करण्यासाठी अनुमोदना दिली.
आज परिवार व आश्वी सोडून मी गुरूनीजींच्या सानिध्यात संयमी व्रत धारण करीत आहे. सकल जैन वासियांनी परिवाराची कन्या समजून थाटामाटात हा दीक्षा महोत्सव करीत मला संयमी व्रतासाठी प्रेरणा दिली.
परिवारामध्ये संत होणे, यास पूर्व पुण्याई लागते. ही पुण्याई भंडारी परिवारात व आश्वी वासीयांत असल्यामुळेच दीक्षा महोत्सव उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडला. या दीक्षा महोत्सवासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष रमणलाल लुंकड, बाबुशेठ बोरा, डॉ. संजय मालपाणी, राजेंद्र पिपाडा, नंदूशेठ भटेवरा, जलाल महाराज सय्यद, विखे कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, अॅड. शाळीग्राम होडगर, भगवानराव इलग यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून हजारो भाविक उपस्थित होते.
दीक्षा महोत्सवासाठी भामाशाह रमणलाल लुंकड, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुपा गोडगे, सुमतीलाल गांधी, विनीत गांधी, अभिजीत गांधी, किशोर पटवा, प्रवरा बँकेचे संचालक संजय गांधी, योगेश रातडीया, राजेंद्र लुणीया, सागर रातडीया, योगेश लुंकड, जयंतीलाल भंडारी, अनिल पितळे, स्वप्नील लुंकड,कल्पेश लाहोटी, अभिजीत बिहाणी, केतन बिहाणी, विजय बिहाणी, नंदूशेठ लाहोटी, अश्विन मुथ्था, ईश्वर भंडारी, प्रितम गांधी, किरण गांधी, दिपक बोरा, मंगेश रासने, रोहित भंडारी, अमित भंडारी, यश बोरा, नितीन गांधी, निलेश चोपडा, पंकज नाके, पंकज कोळपकर, समीर गांधी, भगवान बोरा, श्रेणीक बोरा, प्रशांत गांधी, गौतम गांधी, गौतम रातडीया, निलेश रातडीया, रमेश धर्माधिकारी यांच्यासह जैन श्रावक संघाचे सदस्य, नवकार ग्रुप सदस्य यांनी दीक्षा समारंभ यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
