महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठानच्या वतीने भूम येथे गुरुवारी (दि.१३ जून) गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
मागील १७ वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भूम नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे हे होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संयोगिता गाढवे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे, संतोष आघाव, सिद्दिकी हकीम करीम, युवा नेते साहिल गाढवे, वस्ताद मामू जमादार, उद्योजक सूरज गाढवे, माजी नगरसेवक किरण जाधव, सुमित्रा माळी, मुशिर शेख, रणजित साळुंके, बालाजी अंधारे, महेश गपाट, तानाजी नाईकवाडी, सुनिल थोरात, संदीप मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहरातील शंकर पाटील कनिष्ठ महाविद्यालय आर्ट, सायन्स, कॉमर्स, रवींद्र हायस्कूल, श्री गुरुदेव हायस्कूल, कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्रशाला, कै. महारुद्र बप्पा मोटे हायस्कूल यासह शहरातील तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी पदाला गवसणी घालावी-गाढवे यावेळी बोलताना संजय गाढवे म्हणाले की, भूम शहरातील शाळांमधून शिकलेले विद्यार्थी गुणवंत म्हणून पुढे गेलेले आहेत. प्रशासकीय सेवेत, सैन्य दलात तसेच शासकीय क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
मात्र, भूम शहरातील किंवा तालुक्यातील विद्यार्थ्याने जिल्हाधिकारी पदाला गवसणी घातलेली नाही. आपल्या तालुक्यातील एखादा विद्यार्थी जिल्हाधिकारी व्हावा ही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त करत ज्या विद्यार्थ्यांस शिक्षण क्षेत्रामध्ये काहीही अडचण असेल तर त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन संजय गाढवे यांनी केले.
सर्व प्रशालेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या तसेच ९५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अलीम शेख यांनी तर आभार संजय गाढवे यांनी मानले.
