महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ब्रिटिश काळापासून चालत आलेले तीन फौजदारी कायदे आजपासून (दि. १ जुलै)कालबाह्य होत असून, त्यांची जागा तीन नवीन कायदे घेतील.
फसवणुकीसाठी कलम ४२० नसेल तर कलम ३१६ असेल. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात संसदेच्या उभय सदनांत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे तीन नवे कायदे मंजूर करण्यात आले होते.
भारतीय दंड संहिता (आयपीसी), द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे कालबाह्य होत आहेत. नवीन फौजदारी कायद्यांची महिला, युवक, विद्यार्थी, वरिष्ठ नागरिकांसह समाजातील इतर घटकांना माहिती व्हावी, यासाठी देशभरातील साडेसतरा हजार पोलिस ठाण्यांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आयपीसी कलम १२४ अनुसार राजद्रोह संबधित प्रकरणात शिक्षेची तरतूद आहे. नवीन कायद्यानुसार राज्द्रोहाला आता देशद्रोह संबोधले जाणार आहे. कलम ३०२हत्येच्या प्रकरणात आत कलम १०३ नुसार शिक्षा देण्यात येणार आहे. कलम ३०७ हत्येचा प्रयत्न आता कलम १०९ नुसार शिक्षा होईल.
मानहानी प्रकरणात कलम ३९९ नुसार कारवाई होत असे. आता त्याला कलम ३५६ मध्ये ठेवले आहे.सामुहिक अत्याचार ३७६ नसून आताकलम ७० असेल. पिडीत व्यक्तीला fir ची प्रत पोलिसांना मोफत द्यावी लागेल.
खून ३०२, आता आता १०१, फसवणुक ४२० आता ३१६, जमावबंदी १४४ आता १८७, बलात्कार ३७६ आत ६३, सामुहिक बलात्कार आता ७०, हत्येचा प्रयत्न ३०७ आता १०९ नुसार शिक्षा होतील. दंड सहित आता न्याय संहिता होईल.
