राजयोगिनी बी के डॉ. सुनीता दीदी : ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : परिस्थितीशी झगडताना स्व प्रेरणा महत्वाची आहे. जीवनात काहीही घडू शकते परंतु आपण नेहमी नकारार्थी विचार करतो. स्वतःला होकारार्थी विचार करायची सवय लावायला हवी,असे प्रतीपादन राजयोगिनी बी. के. डॉ सुनीता दीदी यांनी केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस आणि सूर्यदत्त महिला सक्षमीकरण आणि नेतृत्व अकादमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-२०२४’ राजयोगिनी बीके डॉ सुनीता दीदी यांना अध्यात्मिकता, प्रेरणा आणि जगभर मूल्याधिष्टित शिक्षणाचा प्रसार या त्यांच्या कार्याबद्दल प्रा डॉ संजय बी चोरडिया संस्थापक व अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन, उपाध्यक्ष आणि स्वेला च्या अध्यक्ष सुषमा चोरडिया, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
स्कार्फ, मेडल, ट्रॉफी आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.त्यावेळी त्या बोलत होत्या. राजयोगिनी बीके डॉ सुनीता दीदी या ब्रह्माकुमारीज च्या आबू रोड येथील शांतीवन कार्यालयात समर्पित आहेत. त्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका आहेत. विशेष अशा शिवशक्ती लीडरशिप अप्रोच प्रकल्पाच्या भारत आणि नेपाळ साठीच्या त्या फोकल पॉईंट आहेत.
तसेच इंडिया रिजन फॉर सेल्फ इमेजिंग टेकनॉलॉजि प्रकल्प च्या प्रोग्रॅम संचालक आहेत. त्यांना १०० हुन अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. बावधन कँपस येथे झालेल्या या सोहळ्यास सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष आणि स्वेला च्या अध्यक्ष सुषमा चोरडिया, बी के राकेश भाई, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, शीतल फडके, प्रा डॉ सिमी रेठरेकर, प्रा सायली पांड्ये, प्रा किरण राव, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. डॉ.संजय बी. चोरडिया म्हणाले, ‘विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना दरवर्षी सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येते.
पद्मश्री परमपूज्य आचार्य श्री चंदनाजी महाराज (अध्यात्म आणि मानव कल्याण), सिद्धेश्वर सिद्धासन महिला साधक (शिल्पा, नम्रता, नीता, मीनाक्षी) – आरोग्य आणि कौशल्य विकास, सायली आगवणे (परफॉर्मिंग आर्ट्स), डॉ. रुमा देवी (सामाजिक कार्य आणि उद्योजकता), सुमन धामणे-डिजिटल इन्फ्लुएंसर (आपली आजी), विद्या विठ्ठल जाधव (सामाजिक कार्य), डॉ. ललिता जोगड (साहित्य), डॉ. शैलजा काळे (वैद्यकीय सेवा), डॉ. अलका करवा (आरोग्य आणि फिटनेस), डॉ. नमिता कोहोक (शौर्य आणि धैर्य), एड. श्वेता कौशिक (कायदा आणि न्याय), पूर्वा कोठारी (जागतिक उद्योजकता), रेखा नहार (सौंदर्य आणि सामाजिक कार्य), प्राची पंड्या (शास्त्रीय नृत्य), राजश्री पारख (अध्यात्म आणि सामाजिक कार्य), शलाका पारनेरकर (समाजसेवा), संगीता पाटील (शौर्य), तोनिषा पवार (मोटिव्हेशन स्पीकर), डॉ. मुक्ता पुणतांबेकर (सामाजिक कार्य), ऍड. क्रांती राठी (कायदा व न्याय), पोलीस अधिकारी विनिता साहू (प्रशासकीय सेवा), तेजस्विनी सावंत (क्रीडा), अर्चना शर्मा (ग्लोबल एक्सलन्स लीडर), सौंदर्या शर्मा (मनोरंजन), ललिता तिवारी (शिक्षण आणि सामाजिक कार्य), सायली नलवडे-कवितकर (राजकीय प्रचारक) उर्वशी रौतेला (अभिनेत्री) आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बी के डॉ सुनीता दीदी यांनी या प्रसंगी ” बी पॉसिटीव्ह नो मॅटर व्हॉट ” या विषयावर विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. अत्यंत सहज आणि ओघवत्या शैलीत त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना जीवनात होकाराथी असण्याचे लाभ वर्णन केले आणि नेहमीच्या जगण्यातील उदाहरणे देत होकारार्थी कसे होता येईल हे स्पष्ट केले.
परिस्थितीशी झगडताना स्व प्रेरणा महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. जीवनात काहीही घडू शकते परंतु आपण नेहमी नकारार्थी विचार करतो. स्वतःला होकारार्थी विचार करायची सवय लावायला हवी.
आपण स्व कडे लक्ष्य देण्याऐवजी इतर सर्व गोष्टीकडे लक्ष्य देतो, खरे तर आपणाला आपली ओळख करून घेणे आवश्यक आहे. प्रेम, आनंद, सुख, ज्ञान, समाधान प्रत्येकाला हवे आहे. ते आपल्या आत मध्ये आहे.
त्याचा शोध घेणे महत्वाचा आहे. विविध प्रयोगाद्वारे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत होकारार्थी कसे राहता येईल याची उदाहरणे दिली. प्रशांत पितालिया यांनी सूत्र संचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.

