मदत करण्याऱ्यांसह ९ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : शहरातील पंकजनगर भागात विना व्हिजा आणि परवानगीशिवाय भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.
नजमा यासीन शेख ऊर्फ बीठी बेगम (वय ३३, रा. पेरोली थाना कालिया), रेहना बेगम समद शिकंदर ऊर्फ साथी (वय ३३, रा. परहाजिगिरम थाना तेरेखोदा), शिखा शाकिब बुहिया (वय २३, रा. लष्करपूर थाना तिरुखदा), आरजीना खातून अन्वर शेख (वय १९, रा. परहाजिगिरम थाना तेरेखोदा), शोएब ऊर्फ शएब सलाम शेख (वय २४, रा. पेरोली थाना कालिया)
विशाल मांगडे (रा. मांगडे चाळ, बार्शी), राणी (पूर्ण नाव माहित नाही, रा. तेलगिरणी चौक, बार्शी), किरण परांजपे (रा. तेलगिरणी चौक, बार्शी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस उपनिरीक्षक सोनम जगताप यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, पंकजनगर भागात छापा टाकून या व्यक्तींची चौकशी करण्यात आली.
त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही अधिकृत कागदपत्रे, व्हिसा किंवा परवाना आढळला नाही. त्यांनी प्रवासी कागदपत्रांशिवाय आणि भारत-बांगलादेश सीमेवरील अधिकार्यांची लेखी परवानगी नसताना अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले.
सोलापूर युनिटच्या दहशतवादी पथकाचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ कदम, एटीबीचे निरीक्षक डी. एस. बोरीगिड्डे, तसेच पोलिस उपनिरीक्षक सोनम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. आरोपींना मदत करणाऱ्या बार्शीतील विशाल मांगडे, राणी आणि किरण परांजपे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला
असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. सहा बांगलादेशी नागरिक आणि त्यांच्या मदतनीसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत. यामध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
तसेच त्यांना मदत करणारे तीन स्थानिक नागरिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात १ लाख ४१ हजार ६०० रुपयांची रोख रक्कमही जप्त केली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
