महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : संत दर्शनाने भाग्य उजळते आणि संत सेवेने सौभाग्य उजळते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीत अनेक साधुसंत होऊन गेले. आषाढी वारीमध्ये जसे वारकरी धर्मची पताका आपल्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करतात त्याचप्रमाणे जैन धर्मातील विहार सेवेकरी देखील बाराही महिने साधू संतांची भक्तिभावे सेवा करत आहेत असे मत बाळासाहेब धोका यांनी व्यक्त केले.
गुरु गणेश आनंद विहार सेवा पुणे याच्या गौरव सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलत होते. श्री जैन श्रावक संघ वडगाव धायरी यांच्यावतीने जैन साधुसंतां ची विहार सेवकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन ज्ञान आरोही पूज्य संबोधीजी म.सा. आदी संताच्या सानिध्यात करण्यात आले.
या अनोख्या सोहळ्यात भक्तिशक्तीचा संगम पाहावयास मिळाला. यावेळी व्यासपीठावर समारोप अध्यक्ष भामाशाह रमणलाल लुंकड, स्वागत अध्यक्ष बाळासाहेब धोका, प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुमतीलाल लोढा, प्रा. डॉ. अशोक पगारिया, रमेश बागमार, मोहित अगरवाल, अशोक मते, विद्या बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ लोढ़ा यानी विहार साथीसाठी अपघाती विमा पॉलिसी देण्याचे आश्वासन दिले. पगारिया यांनी विहार साथींना मोलाचें मार्गदर्शन केले. यावेळी विहार दामिनी सपना छाजेड, विहार साथी तेजमल मुनावत, दीपक छाजेड, दर्शन लोढा, यांना शाल, मोत्याची माळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी पल्स हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते या शिबिराचा लाभ सर्व गरजूंनी घेतला. सदरील कार्यक्रम सुवासिनी मंगल कार्यालय धायरी येथे संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघपती प्रकाशचंद बोरा, चातुर्मास समिती अध्यक्ष महेश फिरोदिया जैन श्रावक संघ वडगाव धायरी चे सर्व सभासद आनंद महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. गौतम प्रसादी चा लाभ नहार परिवारास मिळाला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश जैन व आरती जैन यांनी केले.