आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाकड, दुबईत एकाच वेळी बिष्णोई टोळीचा कॉल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 27, 2026
Spread the love

पुणे : बिष्णोई टोळीने अमेरिकेतील व्हर्जिनिया येथून पुण्यातील उद्योजकांना फोन करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिष्णोई टोळीने वाकड आणि दुबई येथे एकाच वेळी उद्योजक पती-पत्नीकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर संपूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील तिसऱ्या व्यावसायिकालाही खंडणीसाठी धमकावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील पार्क स्ट्रीट या अत्यंत उच्चभ्रू सोसायटीत ३४ वर्षीय महिला राहते. तिचे पती व्यावसायिक कारणामुळे सध्या दुबई येथे आहेत.

दोघेही उद्योजक आहेत. बुधवारी रात्री दोघांनाही परदेशातून फोन करण्यात आला. त्यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.

पैसे दिले नाहीत तर त्यांचे कुटुंब संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी तातडीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.