आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ताम्हिणी ५२५, लोणावळा २७९, भिरा ५७४ मिमी पाऊस

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 8, 2026
Spread the love

पुणे : आळंदीमधून बुधवारी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्याचवेळी लोणावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या महापुराचे सावट पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावर पडले आहे. राज्यातील विविध भागांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांना आळंदीत पोहोचणे कठीण झाले आहे.

लोणावळा येथे गेल्या २४ तासांत २७९ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत तेथे एकूण २,५३९ मिमी पाऊस झाला आहे. ताम्हिणी येथे ५२५ मिमी पाऊस पडला असून, आतापर्यंत २,९३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

भिरा येथे ५७४ मिमी पाऊस झाला असून, तेथे आतापर्यंत ३,९९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

याशिवाय दावडी – ४८८, डोंगरवाडी – ३६५, मुळशी – ३०४, शिरगाव – ४५०, कोयना (नवजा) – २७६, वळवण – २०७, खोपोली – १९६ आणि आंबोणे – ३१८ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे.