आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खडकवासला धरणात ८९ टक्के पाणीसाठा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 27, 2026
Spread the love

पुणे : एल निनोमुळे देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सूनने जोरदार वर्षाव सुरू केला असून तो अद्यापही सुरू आहे. त्यामुळे पश्चिम घाट परिसरातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील २७ धरणांपैकी १६ धरणे भरत आल्याने त्यांतून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे उजनी धरणात तब्बल ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीइतकाच ८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अद्याप कायम आहे. खडकवासला १०० टक्के, पानशेत ९४ टक्के, वरसगाव ८७ टक्के, तर टेमघर ७४ टक्के भरले आहे.

खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी २५.९८ टीएमसी म्हणजेच ८९.११ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २६.१५ टीएमसी म्हणजेच ८९.६८ टक्के पाणीसाठा होता.

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे.