वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून प्रवचन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ज्याला आत्मिक संपत्ती मिळते त्याला बाहेरच्या संपत्तीची गरज वाटत नाही. त्यामुळे आपला आतला आवाज ऐकण्यासाठी आपण प्रवचन ऐकले पाहिजे. शरीरातील आत्मिक संपत्ती हीच खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले.
पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, स्वतःला जाणून घेण्यासाठी आपण प्रवचने ऐकतो. महावीरांनी पन्नास हजारो लोकांना दीक्षा दिली. ज्यांनी ती ऐकली, पारखली,आचरणात आणली ते भाग्यशाली ठरले. आपण ऐकायला शिकलं पाहिजे.
आपण ऐकतच नाही, ऐकत असताना आपली बडबड चालूच असते. इंग्रजीत hearing आणि listing शब्द आहेत. hearing म्हणजे ऐकणे आणि listing म्हणजे आपल्या सोबत जोडले जाणे. आपण आतला आवाज ऐकायला पाहिजे. जीवनात चार गती आहेत.
त्यातील मनुष्य गती सर्वात महत्त्वाची आहे. कोणालाही देव गती आधी प्राप्त होत नाही. मोक्ष मिळाल्यानंतरच तुम्हाला देवगती प्राप्त होते. ज्यांनी ते आचरणात आणलं ते भाग्यशाली ठरले. त्यामुळे देवांनी देवगतीला नाही तर मनुष्यगतीला दुर्लभ म्हटले.
जोपर्यंत तुम्ही जागृत होत नाही तोपर्यंत शिकण्यासाठी तुम्ही समर्थ होत नाही पण जेव्हा तुम्ही जागाल तेव्हा तुम्हाला प्रवचन ऐकण्याची इच्छा होईल. वस्तू महत्त्वाची नाही तर वस्तूच्या प्रति आपली आसक्ती महत्त्वाची आहे अल्प आरंभ आणि अल्प परिग्रह हेच मनुष्याच्या जीवनाचे कारण आहे.
आसक्ती अशी बारीक गोष्ट आहे जी आपल्याला कळत देखील नाही पण कधी ती आपल्या स्वता वर झाली आहे. धर्माचा अधर्मावर विजय मिळवायचा असेल तर साधन शुद्ध असले पाहिजे. स्वतःला प्राप्त करणे हेच आपले साध्य आहे. बाकीचे सगळे साधन आहेत त्यावर विजय मिळवता आला पाहिजे. असे मत पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजीयांनी व्यक्त केले.
