महावीर इंटरनॅशनलच्या नूतन सभामंडपाचे लोकार्पण व नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी संपन्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर – भगवान महावीर स्वामींच्या विचाराने प्रेरित होऊन महावीर इंटरनॅशनल, नगरमध्ये समाजाभिमुख कामे व मदतकार्य करत आहे. “मानवसेवा हीच खरी सेवा” हा भगवान महावीर स्वामींचा विचार प्रत्यक्षात आणत मानवातच ईश्वर पाहिला जात आहे. या कार्यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा.
अहिल्यानगर केंद्राचे काम राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून नगरचा नावलौकिक उंचवावा. भगवान महावीर स्वामींच्या विचाराने प्रेरित होऊन मीही समाजासाठी जास्तीत जास्त काम करत आहे. भविष्यात शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी महावीर इंटरनॅशनलने चौक सुशोभीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आ. संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून महावीर इंटरनॅशनल, अहिल्यानगर केंद्राच्या नूतन सभामंडपाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दानशूर उद्योगपती संपतलाल बाफना, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेविका मीना चोपडा, अनिता शेटिया व सुनिता फुलसुंदर, महावीर इंटरनॅशनलचे सभागीय अध्यक्ष विकास पाटणी, संतोष बोथरा, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य धनराज संचेती व मनोज शेटिया, संजय चोपडा आदींसह पदाधिकारी व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात महावीर इंटरनॅशनलचे नूतन अध्यक्ष राजेंद्र बोथरा, सचिव वसंत बोरा, खजिनदार गौतम पारख तसेच महिला आघाडीच्या नूतन अध्यक्षा वर्षा बाफना, सचिव अपर्णा बोथरा व खजिनदार उल्का पारख, सतीश चोपडा, सरला बरमेचा, निलेश बोथरा, अक्षय बाफना आदींना महावीर इंटरनॅशनलचे सभागीय अध्यक्ष विकास पाटणी यांनी पदभार दिला.
नूतन अध्यक्ष राजेंद्र बोथरा म्हणाले, महावीर इंटरनॅशनलच्या अहिल्यानगर केंद्राच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. सर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी निष्ठेने पार पाडणार आहे. माझ्या कार्यकाळात जास्तीत जास्त शैक्षणिक, सेवा व मदत उपक्रमांना प्राधान्य देणार आहे.
प्रास्ताविकात गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मनोज शेटिया यांनी महावीर इंटरनॅशनलच्या अहिल्यानगर केंद्राच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देत ३० वर्षांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच माजी आमदार अरुणकाका जगताप व अहिल्यानगर केंद्राचे संस्थापक स्व. रमेश बाफना यांचे स्मरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेरू कर्नावट यांनी केले, तर वसंत बोरा यांनी आभार मानले. वर्षा बाफना यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास महावीर इंटरनॅशनल नगर केंद्राचे निर्मला बाफना, नरेंद्र बाफना, दिलीप कर्नावट, डॉ. प्रकाश कांकरिया, माणिकचंद कटारिया, वैशाली शेटिया, अरुण पारख, अरुणा सुराणा, अपर्णा बोरा, सुनिता कर्णावट, सरला बरमेचा, सतीश बोथरा, सतीश चोपडा, दिनेश शिंगवी, राजेंद्र बलदोटा, निलेश बोथरा, सुमित लोढा, सुरेखा पारख, उज्वला बोथरा, सज्जनबाई कटारिया, मनीषा शिंगवी आदींसह सदस्य व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.


















