महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जाणीव फाऊंडेशनतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रम व प्रेरणादायी ग्रंथवाटप उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
१४ एप्रिल रोजी सातारा रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ३०० शैक्षणिक व महापुरुषांवरील प्रेरणादायी पुस्तके वितरित करण्यात आली. सोशल मीडिया आणि दूरचित्रवाणीच्या प्रभावामुळे वाचनसंस्कृतीला आलेले आव्हान लक्षात घेऊन, जाणिव फाऊंडेशनतर्फे हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल काटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, सहकारनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र गौड, सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे, तसेच मिलिंद पन्हाळकर, किशोर आवाळे, संदीप काळे, सागर जाधव, गणेश हिवरेकर, विनोद शिंदे, शंकर साळुंखे, श्रीकांत कांबळे, करण बोदडे, अनिल ननावरे, राणू कांबळे, किरण साबळे, परशुराम दुपारगुडे, ऋतुराज पन्हाळकर, रविंद्र सोनावणे, कैलास थोरात सर, विकी शिंदे, वैभव वांढरे, रावसाहेब बोराडे आणि शिवशरण ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
गायक राणू कदम व सुदाम कुंभार यांनी भावपूर्ण गीतांच्या माध्यमातून महापुरुषांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी गोपाळ कांबळे यांनी केले. यावेळी करण बोदडे व संदीप काळे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
