भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आशीर्वाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने श्री भैरवनाथ यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरून सोनारी नगरीत येणाऱ्या भाविक भक्तांना 400 जार पाणी मोफत वाटप करण्यात आले. कडक उन्हात लहान बाळांना घेऊन सोनारी नगरीत येणारे भाविक भैरवनाथाचे दर्शन घेत असताना त्यांना तहान लागली होती. त्यावेळी ओन्ली समाजसेवा संस्थेने ठेवलेल्या पाण्याच्या सुविधा घेऊन भाविक आपल्या तहानलेला घशाला शांती दिली.
सोनारी नगरीतील या उपक्रमात पाणी पिऊन आणि भरून घेणारे भाविक त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव व्यक्त करत होते. दोन वर्षांपासून संस्थेने हा पाणी वाटप उपक्रम सुरू केला आहे. पाणी वाटप करत असताना संस्थेतील पदाधिकारी, सदस्य, महिला सदस्य यांनी अत्यंत विनम्रतेने भाविकांशी संवाद साधला.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरातील मित्रपरिवार, व्यापारी, शिक्षक, आणि संस्थेतील सदस्यांनी निधी दिला. त्यांच्यामुळेच सोनारी येथे भाविकांना मोफत पाणी वाटप करणे शक्य झाले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणारे प्रमुख व्यक्ती: राहुल वाणी, संतोष शेळगावकर, नागनाथ सोनवणे, माणकोजी ताकभाते, अजय तिवारी, अतुल वाणी, सुरेंद्र स्वामी, सायरा मुल्ला मॅडम, सारीका जाधवर, रागिनी झेंडे, त्रिशाला मिसाळ, रेखा सरवदे, कु. रितेशा झेंडे, सुनील नवले, विजय येवारे, गणेश सातारकर, अमोल जाधव (राऊळ), पिंटू मस्के, अण्णा जाधव, धीरज परदेशी, श्रीमंत चव्हाण, अमोल शिंदे, सतीश कोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सोनारी गावचे समाजसेवक नितीन गाढवे आणि ईश्वर सोनवणे यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महत्त्वपूर्ण ठरले. संस्थेच्या वतीने सर्व निधी दान करणारे व्यक्ती आणि उपस्थित राहणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन करत, संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे महत्त्व प्रतिपादन केले.
