२०२५ ते २०३० साठी आरक्षण निश्चित
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भुम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. या वेळी तहसीलदार जयवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया पार पडली. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग (ना.मा.प्र.) आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गात उमाचीवाडी, जेजला, बावी, बेलगाव, कानडी, हिवर्डा, जयवंतनगर, तांबेवाडी, दांडेगाव आणि मात्रेवाडी या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून, हिवर्डा, जयवंतनगर, तांबेवाडी, दांडेगाव आणि मात्रेवाडी या पंचायती महिला आरक्षणासाठी निवडल्या गेल्या आहेत.
अनुसूचित जमाती प्रवर्गात केवळ वाकवड ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून ती महिला आरक्षणासाठी आहे. ना.मा.प्र. प्रवर्गात आरसोली, ईडा, गोलेगाव, डोकेवाडी, पखरुड, माळेवाडी, सोन्नेवाडी, नळीवडगाव, भोगलगाव, वांगी खुर्द, सावरगाव दे, आनंदवाडी, गोरमाळा, हिवरा, गिरवली, वेदरवाडी, जांब, सावरगाव पा, ईराचीवाडी आणि निपाणी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
यापैकी सावरगाव दे, आनंदवाडी, गोरमाळा, हिवरा, गिरवली, वेदरवाडी, जांब, सावरगाव पा, ईराचीवाडी आणि निपाणी या दहा ग्रामपंचायती महिला आरक्षणासाठी निवडण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारण प्रवर्गात अंतरगाव, अंतरवली, आंद्रुड, चिंचोली, चुंबळी, जोतीबाचीवाडी, तिंत्रज, दिंडोरी, देवंग्रा, नागेवाडी, नान्नजवाडी, पाथरूड, माणकेश्वर, लांजेश्वर, वांगी बु, वालवड, साडेसांगवी, सोनगिरी, हाडोंग्री, आष्टा, उग्रुप, रामेश्वर आणि रामकुंड या ग्रामपंचायतींची निवड झाली आहे.
यापैकी रामकुंड, दुधोडी, बागलवाडी, वरुड, चिंचपूर ढगे, गणेगाव, चांदवड, देवळाली, वाल्हा, वारेवडगाव, राळेसांगवी, पाटसांगवी, ब-हाणपूर, ईट, आंबी, घाटनांदुर, वंजारवाडी, सुकटा, वडाचीवाडी, अंजनसोंडा आणि शेखापूर या ग्रामपंचायती महिला आरक्षणासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.
या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आणि मागास प्रवर्गातील नागरिकांना अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास तहसीलदार जयवंतराव पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रम शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडल्याने ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
