विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांचे आदेश
महाराष्ट्र जैन वार्ता
मुंबई : जैन साधू-संतांच्या पदयात्रेदरम्यान होणारे अपघात आणि हल्ले टाळण्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांनी दिले आहेत.
राज्यात जैन साधू-संत पदयात्रा करतात. त्यावेळी महामार्गावर काही अपघात होतात, तसेच काही ठिकाणी असंतुष्ट सामाजिक घटकांकडून जैन साधू-संतांवर हल्ले करण्यात येतात.
त्यामुळे सर्व पोलिस अधिकारी आणि घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जैन साधू-संतांचा दौरा असताना आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे देवेन भारती यांच्या आदेशात म्हटले आहे.
सर्व पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांना हे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनीही यासंदर्भात आदेशाचे पत्र काढले आहे.
अर्थसंकल्पीय चर्चेत केली मागणी – काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल पत्र लिहिले होते. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान त्यांनी यासंदर्भात मागणी केली होती. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनीही यासाठी प्रयत्न केले होते.

